Skip to main content

आंतरराष्ट्रीय योग दिन


आज दिनांक 21 जून 2018 आंतरराष्ट्रीय योग्य दिन त्यानिमित्ताने सर्व शिक्षक बांधवाना शुभेच्छा.
दरवर्षी २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत यासाठी प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका,इंग्लंड,चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
दोन वर्षांत या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. १८ जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योग सेशन झाले.स्वत: अबॉट यांनी यावेळी योगासने केली.

आता आपण योगा विषयी थोडक्यात माहिती घेऊया.

योगाचा शब्दश: अर्थ :जोडणे (संस्कृत युज्: जोडणे). ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आचरणात आणली जाणारी प्राचीन भारतीयप्रक्रियापद्धती आहे. जीवात्मा आणि विश्वात्मा यांच्यातील एकत्व अनुभवण्याची पद्धत असेही याचे वर्णन केले जाते. यमनियमयोगासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.
बरेचदा योगासने या अर्थी योग या शब्दाचा वापर होतो. प्राणायाम हा योगाचा एक अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. प्राणायाममुळे शारीरिक व मानसिक शक्ती बळावते शरीर निरोगी राहतेच पण मन सुद्धा निरोगी राहते.
प्राणायामामुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनाची एकाग्रता वाढते.

योगाचे प्रकारसंपादन करा

भारतीय योग शास्त्र मध्ये पाच योग सांगितले आहेत -
  • ज्ञान योग -- आत्मज्ञान,
  • हठ योग -- आसन आणि कुण्डलिनी जागृति
  • कर्म योग -- योग: कर्मसु कौशलम् (कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग)
  • भक्ति योग -- भजनकुर्याम-भजन करा.
  • राजयोग -- योगः चित्तवृत्ति निरोधः (चित्तातील वृत्तिंवर नियंत्रण ठेवणे हाच योग आहे)
पतंजलिंनी योग चा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत:
  • यम (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
  • नियम (स्वाध्याय, सन्तोष, तप, पवित्रता, आणि ईश्वर च्या प्रति चिन्तन) बाहेरचे अंग
  • योगासन बाहेरचे अंग
  • प्राणायाम बाहेरचे अंग
  • प्रत्याहार बाहेरचे अंग
  • धारणा आतले/मानसीक अंग
  • ध्यान आतले/मानसीक अंग
  • समाधी आतले/मानसीक अंग
  • योगश्चित्तवृत्ति निरोधः। या सूत्राचा अर्थ आहे - योग तो आहे जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मां पर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो• चित्तवृतिंच्या निरोध (दमनाने)नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होउ देणे होय•
    योगाचा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारतउपनिषद, पतञ्जलिंचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात•
    योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योग ची लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय• चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होउ शकतात• व्यक्तिंच्या निर्माण आणि उत्थान मध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहुंमुखी विकासामध्ये ही याचा उपयोग सिद्ध झाला आहे• योग मनुषयामध्ये सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे• जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनिंनि आविष्कृत केले होते• महर्षि पतंजलिनी अष्टांग योग च्या रूपात याला अनुशासनबद्ध, सम्पादित आणि निष्पादित केले•
  • अर्थ आणि परिभाषासंपादन करा

    जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्माबरोबर मिलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिकमानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश्य असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मीळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे.
    योग वैदिक/हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनएक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोग बरोबर आहे जो एक ब्रह्मन्‌ मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानचा राजसी मार्ग आहे.
    हिंदू धर्मात योगाचे कित्येक प्रकार पण आहेत उदा. निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग विवेकपूर्ण ध्यान.
    योग वर पतञ्‍जलि मुनिंनी योगसूत्र जवळजवळ १५० ई.पू. मध्ये लिहीले. पतंजलिंच्या अनुसार अष्टांग योग चे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते . याच अष्टांग पथ ने नंतर येणाऱ्या राज योगतन्त्र आणि बौध वज्रयान योग चा पाया टाकला...
सौजन्य -विकिपीडिया.

Comments

Popular posts from this blog

कुसुमावती देशपांडे

समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘...

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...