Skip to main content

दादा धर्माधिकारी








प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी (निधन १ डिसेंबर, १९८५) यांचा जन्म इ.स. १८८९ मध्ये मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.
धर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यानदेखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीमध्ये भाग घेत राहिले. १९३५मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना तेा भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.
भारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटकेनंतर जेव्हा ते सुटून कारागृहाबाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली.
दादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे.
कॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी हे दादा धर्माधिकारींचे सुपुत्र.

दादा धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • अहिंसक क्रांति की प्रक्रिया (हिंदी)
  • आपल्या गणराज्याची घडण (मराठी)
  • क्रांतिशोधक (हिंदी)
  • गांधीजी की दृष्टी (हिंदी)
  • गांधीजी की दृष्टी अगला कदम (हिंदी, जर्मन)
  • तरुणाई (मराठी)
  • दादा की बोध कथाएं (मराठीत, दादांच्या बोधकथा, बाग १ ते ३)
  • दादांच्या शब्दांत दादा, भाग १, २.
  • नये युग की नारी (हिंदी)
  • नागरिक विश्वविद्यालय - एक परिकल्पना (मराठी)
  • प्रिय मुली (मराठी)
  • मानवनिष्ठ भारतीयता (हिंदी, मराठी)
  • मैत्री (मराठी)
  • युवा और क्रांति (मराठीत, क्रांतिवादी तरुणांनो)
  • लोकतंत्र विकास और भविष्य (मराठीत, लोकशाही विकास आणि भविष्य)
  • समग्र सर्वोदय दर्शन (मराठीत, सर्वोदय दर्शन)
  • स्त्री-पुरुष सहजीवन (हिंदी, मराठी)
  • हिमालय की यात्रा (अनुवाद; मूळ गुजरातीत, लेखक दत्तात्रेय बालकृष्ण कालेलकर)
  • सौजन्य/संदर्भ -विकिपिडिया

Comments

Popular posts from this blog

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

सामाजिक समतेसाठी अविरतपणे झटणारे आज राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती.

  राजर्षी छत्रपती शाहू महाराज , ( जून २६ ,  इ.स. १८७४  -  मे ६ ,  इ.स. १९२२ ) हे  कोल्हापूर  राज्याचे इ.स. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते. शाहु महाराज सुधारणावादी होते . जीवन राजर्षी शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म  जून २६ ,  इ.स. १८७४  रोजी  कागल  येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च,  इ.स. १८८४  रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.  एप्रिल २ ,  इ.स. १८९४  रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे  मे ६ ,  इ.स. १९२२  रोजी त्यांचे निधन झाले. . जन्मदिवस शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला ...