Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

नवीन सत्रातील पाठ टाचण नियोजनाबाबत महत्वपूर्ण सूचना -

सर्व शिक्षक बंधू- भगिनींना नमस्कार  सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे आपल्याला पाठ टाचण app मध्ये कोणतेही टाचण दिसत नसणार आहे,                                                   तसेच दिवाळीच्या सुट्ट्या हि बाब प्रत्येक जिल्हा परिषदेच्या नियोजनानुसार असल्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील  १ ली ते ८ वी च्या शाळेस एकसारख्याच सुट्ट्या असतील असे सांगता येत नाही.त्यामुळे याबाबतीत आम्हाला हे नियोजन करताना अडचणी येतात.त्यामुळे आम्ही दिवाळीच्या सुट्टी नंतर दुसरे सत्र सुरु होण्याची तारीख हि - दि ०६/११/२०१७ अशी धरली आहे,त्यानंतर लगेचच दोन दिवसात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या चाचणीचे आयोजनही करावयाचे आहे.त्यामुळे निवडलेली तारीख योग्य आहे असे आम्हाला वाटते. तरी वरील सर्व बाबींची आपण सर्वांनी नोंद घ्यावी,तसेच आपल्याला सध्या पाठ टाचण दिसत नसले तरी सत्र सुरु होण्याच्या दोन दिवस अगोदर  म्हणजे तुम्हाला दि-०४/११/२०१७   पासून सर्व वर्गांची टाचण दि...

पाठ टाचण अँप मधील शिक्षक रजिस्ट्रेशन प्रोसेस

पाठ टाचण अँप मध्ये   शिक्षक रजिस्ट्रेशन प्रोसेस दिली आहे, ती कशी पूर्ण आणि कशासाठी दिली आहे हे पाहण्यासाठी, खालील watch video या text ला टच करा. watch video (याचे नोटिफिकेशन आपण डायरेक्ट अँप वर सोडले होते पण त्यामध्ये सध्या तांत्रिक अडचणी असल्यामुळे या माध्यमातून पुन्हा लिंक सोडण्यात येत आहे)

शांता शेळके

शांता शेळके  ( ऑक्टोबर १२ ,  १९२२  -  जून ६ ,  २००२ ) या एक प्रतिभासंपन्न  मराठी   कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक  संगीतकार , एक  लेखिका , एक  अनुवादक ,  बाल साहित्य  लेखिका, साहित्यिक, आणि एक  पत्रकार  होत्या. जीवन- शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, एक संगीतकार, एक लेखिका, एक अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि एक पत्रकार होत्या.त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोल...

डॉ. विजय पांडुरंग भटकर

विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा (ग्राहकहित-'अंबाला' ) या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. भटकरांनी शिक्षणाच्या काळात सर्व विषयांतील साधारणत: पन्नास हजार पुस्तके वाचली, असे म्हणतात. शिक्षणानंतर, त्यांना परदेशी नोकर्‍यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते...

जागतिक मानसिक आरोग्य दिन

10 ऑक्टोबर ही तारीख जगात जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.  या दिनाची पार्श्वभूमी जागतिक मानसिक आरोग्य दिन (10 ऑक्टोबर) हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य प्रशिक्षण, जागरूकता आणि पुरस्कर्ता यासाठी आहे. हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशन (World Federation for Mental Health) यांच्या पुढाकाराने सन 1992 मध्ये प्रथम साजरा करण्यात आला. WFMH ही एक जागतिक मानसिक आरोग्य संस्था आहे आणि याचे सदस्य आणि संपर्क 150 हून अधिक देशांमध्ये आहेत. मानसिक आरो ग्याबाबत जागतिक परिस्थिति आणि त्यामध्ये भारत मानसिक आरोग्य विकार हा जगभरात आढळणारा सामान्य विकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगभरात मानसिक विकाराने ग्रस्त लोकांची संख्या अंदाजे 450 दशलक्ष आहे. भारतात हीच संख्या एकूण 1.5 दशलक्ष आहे, यामध्ये मुले आणि पौगंडावस्थेतील समस्या यांच्या समावेशासह विविध मानसिक आरोग्य समस्यांचा समावेश होतो. मानसिक विकारामध्ये, व्यक्तीच्या आजूबाजूला आढळणार्‍या परिस्थिति आणि त्या व्यक्तीची विचारसरणी यामध्ये जेव्हा तफावत निर्माण होते आणि ती व्यक्ति आलेल्या परिस्थितीला स्वीकारू शकली ...

संकलित मूल्यमापन परीक्षेचे आयोजनाबाबत...

सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार... संकलित मूल्यमापन परीक्षा दिवाळी सुट्टीनंतर सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात घ्यावयाची असल्याने सध्या आपल्या पाठ टाचण  अँप मध्ये सर्व विषयांसाठी सराव व उजळणी या घटकावर आधारित टाचण देण्यात आले आहे, फक्त इयत्ता 1 ली साठी टाचनात संकलित परीक्षेचा उल्लेख केला गेला आहे ,कारण ते टाचण परीक्षा परिषद पुणे यांचे पत्र निघण्यापूर्वी तयार केले गेले होते, याची सर्व वापरकर्त्यांनी नोंद घ्यावी. संकलित मूल्यमापन परीक्षे संदर्भातील पत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड येथे  टच करा.